Header Ads

संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी

जत,संकेत टाइम्स : अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चार मंडल विभाग व 67 गावातील नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालया अभावी होणारी अडचण व गैरसोय दूर होण्यासाठी संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यात यावे,यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे माहिती पुर्व भागातील पदाधिकाऱ्यांनी दिली.




जत हा तालुका सांगली जिल्ह्यातील विस्ताराने सर्वात मोठा असा कर्नाटक राज्याच्या सिमेवरील कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. या तालुक्यात एकून एकशे विस गावे आहेत.तालुक्यात जत येथे तहसिल कार्यालय असून संख येथे अप्पर तहसिल कार्यालय आहे. 



संख अप्पर तहसिल कार्यालय अंतर्गत चार मंडल विभाग येतात. या विभागात संख,उमदी, माडग्याळ व मुचंडी या मंडलविमागाचा समावेश होतो. या चार विभागात एकून 67 गावे असून या सर्व गावाचा महसुली कारभार हा अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चालतो. 





संख येथे अप्पर तहसिल कार्यालय झाल्यापासून जत पूर्व भागातील नागरिकांची एकच मागणी वारंवार जोर धरू लागली आहे की, राज्य सरकारने ज्या प्रमाणे जत पूर्व भागातील लोकांची अप्पर तहसिल कार्यालयाची मागणी त्वरित पूर्ण करून जत पूर्व भागातील लोकांचा जत तहसिल कार्यालयात विविध कामांसाठी ये जा करण्यासाठी होणारा,हेलपाटा,अनमोल वेळ व पैशाची बचत करण्याचे काम केले आहे.



 त्याप्रमाणेच संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करून जत पूर्व भागातील चार मंडलविमागातील व 67 गावातील लोकांची दुय्यम निबंधक कार्यालया अभावी होणारी अडचण व गैरसोय दूर करावी.महसुल विभागाची बहुतांशी कामे ही या कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत. परंतु संख अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चार मंडल विभाग व या विभागातील 67 गावातील लोकांना त्यांच्या जमिनिचे, घरजागेचे, प्लाॅटचे व्यवहार तसेच विविध बॅंकाकडील,सोसायट्याकडील  तारण गहाणखत, तसेच बक्षिस पत्र व मृत्यूपत्र आदी कामासाठी येथील नागरिक व पक्षकारांना तालुक्याच्या ठिकाणी जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयातच येणेशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.




संख या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यास या भागातील लोकांचा जत येथे जाणे-येणेचा त्रास वाचणार आहे. व संख पासून जत दुय्यम निबंधक कार्यालयाचे अंतर ही लांब असल्याने व दुय्यम निबंधक कार्यालयात आल्यानंतर जत पूर्व भागातील लोकांची कामे एका दिवसात न होता. 




त्यासाठी चार चार दिवस पक्षकारांना कामासाठी ताटकळत बसावे लागत असल्याचा येथील पक्षकारांना अनेक वेळा अनुभव आला आहे. तसेच याकामी त्यांचा वेळ व पैसाही खर्च झाला आहे अशी अनुभूती अनेक वेळा आम्हाला पहावयास व अनुभवयास मिळत आहे.असेही अनेक पक्षकारानी सांगितले. 

       

Blogger द्वारे प्रायोजित.