जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील अनेक गावातील शिवारात महावितरणच़्या उघड्या डिपी कललेले खांब व लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांना अनेकदा कळवूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकरी संतापले आहेत.नुकतेच बेवनूर येथे अशाच उघड्या डिपीमुळे ठिनग्या पडून सुमारे 70 एकर जमिनीवरील बोअरवेल्स,वृक्ष, पिके,गवत जळाली आहेत.
उघडे फ्यूज बॉक्स साक्षात मुत्यूचे सापळे | जीव गेल्यावर महावितरण जागे होणार काय ?