Header Ads

जत | देवनाळ कालव्यातून म्हैशाऴचे पाणी सोडा : नागनगौडा पाटील |


जत,प्रतिनिधी : बिळूूूर परिसरात सध्या पाणी टंचाई जाणवत आहे.त्यामुळे म्हैशाळ सिंचन योजनेच्या देवनाळ शाखा कालव्यातून तातडीने पाणी सोडा,अशी मागणी बिळूरचे संरपच नागनगौडा पाटील यांनी केली आहे.




बिळूर परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागासह बागायत शेती मोठ्या प्रमाणात आहे.सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.अनेक विहिरी,कुपनलिकाचे पाणी अखेरीला आले आहे.त्याशिवाय काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.

अंकले पंपहाऊसमधून बिळूर कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे.ते खलाटी पंपहाऊसमधून बिळूर परिसरातील ओढापात्र सोडून बंधाऱ्यासह बिंळूर तलाव भरा,अशीही मागणी पाटील यांनी केले आहे.



Blogger द्वारे प्रायोजित.