Header Ads

बसवविचार समाजाला मार्गदर्शक ठरतील : एम.जि.करंजनगी 








 

गुगवाड,वार्ताहर : बेळुंखी (ता जत) येथे बसव सत्संग कार्यक्रम संपन्न झाला.सविता सदाशिव माळी सहपत्नी यांच्या शुभ हस्ते महात्मा बसवेश्वर फोटो पूजा करण्यात आली.

चेअरमन महादेव जानू माळी यांच्या शुभहस्ते षटस्थल ध्वजारोहण केला.सामूहिक प्रार्थना करण्यात आली. 

यावेळी एम.जि.करंजनगी म्हणाले, सत्संग शक्तीचे महत्व वाढत आहे.लोकांना वास्तविकतेची जाण होत असल्याने सत्संग परिवर्तन करण्यासाठी यापुढच्या काळात मार्गदर्शक ठरणार आहे.बसव विचार जिवनातील सुखासाठी अत्मासात करा.जातीभेद,आर्थिक असमतोलन, राजकीय भेदभाव दूर करण्यासाठी बसवतत्व विचार अत्यंत गरज आहे. म्हणून अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होणं गरजेचे आहे. 

 

 


 



 



 





 




Blogger द्वारे प्रायोजित.