Header Ads

जतच्या मंडळ अधिकार्याला निलंबित करा | संजय कांबळे : विविध मागण्यासाठी रिपाइचे निवेदन

 


 

जत,प्रतिनिधी : जिल्हयातील भूमिहीन व बेघरांना शेतजमीन व घरकुल देण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली आहे.

राज्यातील भूमीहीनाना पाच एकर जमीन द्यावी याप्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत खालील मागण्या करण्यात येत आहेत.गायरान जमिनीवरील 14 एप्रिल 1990 पर्यंतचे अतिक्रमण नियमित करण्याचा शासन आदेश आहे. त्यात सुधारणा करून 15 एप्रिल 2015 पूर्वीचे गायरान जमिनी वरील अतिक्रमण नियमित करणारा शासन निर्णय सरकार ने घ्यावा, जिल्हयातील भूमिहीनांना उदरनिर्वाहाचे साधन नाही भूमीहीनांना 5 एकर जमीन कसण्यासाठी द्यावी,  मागासवर्गीयांचा सरकारी नोकरीतील अनुशेष त्वरित भरावा, बेरोजगारांना रोजगार द्यावा रोजगार देता येत नसेल तर बेरोजगारांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा.बेघरांना मोफत घरकुल योजना द्यावी, अंकलखोप येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक लोकार्पण करून पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, जतचे भ्रष्टाचारी मंडळ आधिकारी संदीप मोरे यांना निलंबित करावे, अशा प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांचा राज्य शासनाने गांभीर्याने विचार करून मान्य कराव्यात अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

 

 

सांगली जिल्ह्यातील विविध मागण्यासाठी रिपाइच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Blogger द्वारे प्रायोजित.