बिळूर परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी : प्रकाश जमदाडे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी
निवेदनात म्हटले आहे,८ ऑगष्ट रोजी बिळूर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला,त्यामुळे पिंकाचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी पिके वाहून गेली आहेत.पाणी थांबून राहिल्याने पिके कुजली आहे,घराचीही पडझड झाली आहे.तसेेच यापूर्वी ही बिळूर भागात गतवर्षी 20 व 21 नोंव्हेबरला झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष बागेचे अतोनात नुकसान झाले होते,त्याचे पंचनामे होऊनही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही.
त्यामुळे दोन्ही वर्षाची नुकसान भरपाई सरकारने द्यावी.दरम्यान हवामानातील बदलाची माहिती 2 दिवस अगोदर मिळणेसाठी तालुक्यात नवीन तंत्रज्ञान विकसित करावे,अशीही मागणी निवेदनात केली आहे. निवेदनाच्या प्रती तालुका प्रशासनालाही देण्यात आल्या आहेत. यावेळी जत सोसायटी चेअरमन मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी ,एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील ,समर्थ पतसंस्थेचे संचालक योगेश व्हनमाणे उपस्थित होते.