जत,संकेत टाइम्स : मागासवर्गीय समाजासाठी असणारे महाज्योतीचे 125 कोटी व समाज कल्याणचे 105 कोटी रुपयांचे निधी वापराविना शासनाकडे परत करून संबधित अधिकाऱ्यांनी बहुजन समाजाचे अतोनात नुकसान केले आहे,तो निधी पुन्हा समाजकल्याण विभागा मार्फत बहुजन समाजाला द्यावा, या मागणीचे निवेदन दलित पँथरच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना देण्यात आले.
मागासवर्गीय समाजाचा निधी तात्काळ परत द्या; दलित पँथर