Header Ads

जतचा मोठा भाग ओलिताखाली येणार ; प्रकाश जमदाडे | ना.जयंत पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत






जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पूराचे पाणी दुष्काळ तालुक्यास देणेसाठी पाटबंधारे खात्याला प्रस्ताव तयार करणेच्या सुचना दिल्या आहेत. या निर्णयाचा आम्ही स्वागत करीत आहोत,सन 2005 सालापासून आम्ही याची मागणी करीत आहोत,कारण जत तालुक्यात एकही बारमाही नदी नाही,पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.त्यामुळे मार्चपासून ऑगस्ट स्पटेंबर पिण्याच्या पाण्यासाठी ट्रकरवरती शासनाचे कोट्यावधी रूपये खर्च होतात.तो खर्च यामुळे वाचणार आहे,तसेच हमखास पाणी उपलब्ध होण्यामुळे शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देणारी पिके घेणे शक्य होणार आहे,अशी माहिती रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी संकेत टाइम्सशी बोलताना दिली.ऑगस्ट 2019 मध्ये 89 गावे व 752 वाडयावस्तीवर 112 टॅकरद्वारे पिण्यासाठी पाणी पुरवले जात होते. तेही जतच्या (बिरनाळ तलाव ) व अंकलगीतील (साठवण तलाव) अशा दोनच ठिकाणी ट्रँकर भरणेची सोय होती.जवळपास 50 किमी अंतरावरून तालुक्यातील सुमारे 70 गावांना पिण्यासाठी टँकरने पाणी अणावे लागत होते. पावसाळ्यात जत तालुक्यातील साठवण तलाव, सिमेंट बंधारे भरून दिलेस त्याचा पाणी टंचाईपासून मुक्तीसाठी फायदा होणार आहे.यापुर्वी ना.जयंत पाटील अर्थमंत्री असताना 1971 पासून अपूर्ण असणाऱ्या गुड्डापूर साठवण तलावास मंजूरी दिली तसेच कंठी, कोळगिरी, कोसारी,गुगवाड, उमराणी, अंकलगी,पांडोझरी(मोटेवाडी), दरीबडची इत्यादी साठवण तलाव व कोल्हापूर पध्दतीचे पंधारे यांना मंजूरी देवून पुर्ण केले आहेत.तालुक्यात जवळपास 28 साठवण तलाव 2 मध्यम प्रकल्प 240 सिमेंट बंधारे व छोटे मोठे पाझर तलाव आहेत.




म्हैशाळ योजनेच्या माध्यमातून उत्तरेस येळवी सनमडी तर दक्षिणेस बिळूरपर्यत पाणी आले आहे.बंधिस्त पाईपलाईनचे कामे गतीने चालू आहेत.आजही संख व दोड्डनाला मध्यम प्रकल्प कोरडा ठणठणीत आहेत.सध्या 5 गांवाना टॅकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे पुराचे पाण्याने साठवण तलाव व बंधारे भरून दिलेस शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे,त्याशिवाय मोठे क्षेत्र ओलिताखाली आल्याने त्यांचे जीवनमान उंचावणार आहे.टॅकर,चारा छावणी इत्यादी वरती शासनाचा होणारा खर्च वाचणार आहे.टंचाई काळातील प्रशासनावरील ताण कमी होणार आहे.दुसरीकडे सांगली व सांगलीच्या पश्चीम भागामध्ये पुराचा धोकाही टळणार आहे.कोरोनाच्या महामारीला प्रतीबंध करणेसाठी सांगली जिल्ह्याबरोबरचं महाराष्ट्र राज्यात ही परिस्थीती समर्थपणे हाताळत आहेत.या भयानक संकटातूनही पुराचे पाणी दुष्काळी तालुक्याला देणेचा निर्णय अतिशय चांगला आहे,असेही जमदाडे म्हणाले,

 




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.