Header Ads

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१व्या गळीत हंगामाचा शुभारंभ


पंढरपूर : वरूणराजाच्या साक्षीने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१व्या गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न झाला.आषाढी एकादशीला साक्षात श्री विठ्ठल धरणीवर अवतरतो म्हणून त्या दिवशी पाऊस होतो अशी एक धारणा आहे. आपल्या गळीत हंगामाच्या शुभारंभ सोहळ्यास देखील वरुणराजाने हजेरी लावली.अर्थात श्री विठ्ठलाच्या आशीर्वादानेच हा सोहळा पार पडला. 



विठ्ठलाचा आशीर्वाद आहे म्हणजे यंदाचा हंगाम विक्रमीच होणार यात शंका नाही,अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.यावेळी आमदार श्री.प्रविण दरेकर, आमदार श्री.शहाजीबापू पाटील, साखर आयुक्त श्री.शेखरजी गायकवाड, मा.जिल्हाधिकारी श्री.गोकुळ मवारे आदींची उपस्थिती होती. 

Blogger द्वारे प्रायोजित.